Savitribai Phule.महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत चालू करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार. योजना अंतर्गत ओबीसी मागास वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये देण्यात येतील योजणे अंतर्गत लाभ कशा पद्धतीने घ्यायचा योजनेची पात्रता काय आहे कोणते विद्यार्थी योजनेअंतर्गत पात्र ठरतील तसेच अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपयांची रक्कम दिली जाईल व या पैशामधून विद्यार्थी आपली चालू शिक्षण करू पुर्ण शकणार आहे तसेच बाहेर गावी राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च अशा प्रकारचा खर्च या साठ हजार रुपयांमध्ये विद्यार्थी करू शकेल. देण्यात येणारी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये दिली जाईल.
योजनेअंतर्गत पात्रता
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
विद्यार्थी शिक्षण घेत असावा
अर्जदार ओबीसी किंवा एसटी प्रवर्गातील असावा
विद्यार्थ्यांनी बाहेरील गावी वस्तीगृहात राहत असावा
अशा पद्धतीने मिळणार शिष्यवृत्ती चा लाभ
मुंबई पुणे व इतर शहरांसाठी 60 हजार रुपयांची मदत मिळणार, नगरपालिका क्षेत्रांसाठी 51 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार, जिल्हा व तालुका स्थानावरील विद्यार्थ्यांना,43 हजार रुपये एवढी मदत मिळणार, यामध्ये अन्न भत्ता, राहण्यासाठी भत्ता, राहण्याचा खर्च भागवता येईल.
अर्ज कसा करावा?
ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली नाही व त्यामुळे शासना अंतर्गत एक अधिकृत वेबसाईट अथवा शासन निर्णय दिला जातील त्यानंतर अर्ज प्रक्रिया चालू केली जाईल, त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता तो अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड, दहावी बारावी प्रमाणपत्र, बोनाफाईट किंवा प्रवेश पावती, पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे लागणार आहे.