Daughter Rights in Father Property काळ बदलला आहे, विचार बदलले आहेत, पण आजही अनेक मुली आहेत ज्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते. याचे कारण त्यांना संपत्तीतील मालमत्ता हक्क आणि इतर हक्कांबद्दल माहिती नसणे. भारतात कोणत्या परिस्थितीत वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नसतो आणि कोणत्या परिस्थितीत असतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच लग्नानंतर मुलीचा हक्क आणि अधिकार कशाप्रकारे बदलतात हे देखील यात समाविष्ट आहे
संपत्तीच्या विभाजनाबाबत भारतात वेगवेगळे कायदे आहेत. वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या हक्काबाबत काय तरतुदी आहेत हे आपण या लेखात पाहू.
भारतामध्ये मुलींचा वडिलांच्या मालमत्तेवरील हक्क
सन २००५ मध्ये हिंदू उत्तर अधिकार कायदा, १९५६ मध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणेद्वारे मुलींना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आली. या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा मुलाइतकाच अधिकार आहे.
२००५ मध्ये वारसा हक्क कायद्यात केलेल्या दुरुस्तीने मुलींच्या हक्कांचे बळकटीकरण झाले. या दुरुस्तीमुळे वडिलांच्या मालमत्तेवरील मुलीच्या हक्काबाबत कोणत्याही प्रकारची शंका दूर झाली.
जर वडिलांनी स्वतः कमावलेल्या मालमत्तेबाबत बोलायचे झाले तर मुलीची बाजू थोडी कमकुवत आहे. वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमीन खरेदी केली असेल, घर बांधले असेल किंवा खरेदी केले असेल तर अशा परिस्थितीत ते आपल्या इच्छेनुसार मालमत्ता कोणालाही देऊ शकतात. याचा अर्थ मुलीचा या मालमत्तेवर कोणताही हक्क नाही आणि मुलाचाही नाही. कारण जमीन खरेदी करणे हे पूर्णपणे वडिलांच्या अधिकारात आहे आणि त्यांना ती विकण्याचा किंवा वाटून देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
२००५ पूर्वी हिंदू उत्तर अधिकार कायद्यानुसार, लग्न झालेल्या मुलीला सह-वारसदार मानले जात नव्हते. तर तिला फक्त हिंदू अविभक्त कुटुंबातील सदस्य मानले जात होते. सह-वारसदार किंवा उत्तराधिकारी म्हणजे ज्यांना त्यांच्या आधीच्या चार पिढ्यांच्या अविवाहित मालमत्तेवर हक्क आहे. एखाद्या मुलीचे लग्न झाल्यास तिला हिंदू अविभक्त कायद्यानुसार कुटुंबाचा भाग मानले जात नव्हते
परंतु २००५ च्या कायद्यातील दुरुस्तीनंतर मुलगी आणि मुलगा यांना समान मानले जाऊ लागले. याचा अर्थ आता मुलीच्या लग्नामुळे वडिलांच्या मालमत्तेवरील तिचा अधिकार बदलत नाही. लग्नानंतरही तिला तिच्या वडिलांच्या आणि स्वतःच्या संपत्तीवर समान अधिकार आहेत
जर मुलीला संपत्तीमध्ये वाटा मिळाला नाही तर ती काय करू शकते?
जर मुलीला संपत्तीमध्ये वाटा मिळाला नाही तर ती न्यायालयात जाऊन आपला हक्क सांगू शकते. तसेच ती दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकते. जर दावा सिद्ध झाला तर मुलीला वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क मिळतो.
हिंदू मालमत्ता विधेयक कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला कधी वाटा मिळू शकत नाही?
हिंदू मालमत्ता विधेयकानुसार वडील जिवंत असताना मुलीचा त्यांच्या मालमत्तेवर कोणताही थेट हक्क नाही. मालमत्तेची मालकी वडिलांकडे राहते आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही संपत्ती वंशातील इतर सदस्यांमध्ये वाटली जाते. जसे आई, बहीण, भाऊ इत्यादी.
जर मालमत्तेच्यावर काही गैरकृत्य झाले असेल तर (उदा: एखाद्या गुन्हासाठी कारवाई). अशा परिस्थितीत न्यायालय किंवा संबंधित अधिकारी मालमत्तीचे जप्तीकरण करू शकतात. यामुळे मुलीचा यावर अधिकार राहत नाही.
वडिलांनी भेट म्हणून मालमत्ता हस्तांतरित केली असल्यास किंवा वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी बँक संस्था इत्यादी व्यक्तींकडे दिली असल्यास मुलीला त्यावर कोणताही अधिकार नाही.
अशा परिस्थितीत जर वादाची स्थिती निर्माण झाली असेल तर तुम्ही वकीलांशी संपर्क साधू शकतात.
ही माहिती इंटरनेटवर संकलित केलेली आहे. अधिक माहितीसाठी कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घ्यावा.